शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार..

एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नव्या खरीप हंगामासाठी किमान आधरभूत किमतीसंबंध कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, शेतक-यांच्या कल्याणासाठी खरीप हंगामातील पिकांसाठी एमएसपी वाढ आणि व्याज अनुदान योजना सुरू ठेवणे, है दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या १०-११ रार्थात १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मोठ्या प्रमानात वाढ करण्यात आली आहे.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत दिडपट हमीभाव शेतकऱ्यांना देण्याचे सरकारने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याच धर्तीवर हमीभावातील ही वाढ करण्यात आलेली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतक-यांना मिळणारा अपेक्षित नका ५० टक्क्यांच्याही का असलाचेही वैष्णव यांनी सांगितले. सर्वाधिक नफा बाजरीसाठी (६३%) असून त्यानंतर मक्का (५९%), तूर (५९%) आणि उदीड (५३%) यांचा क्रम लागतो. उर्वरित खरीप पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के नफा मिळण्याचा अंदाज आहे.

तसेच आपण अंदाजे कसा आणि किती भाव मिळणार त्याचा आढावा बघूया, ज्याच्यामध्ये कापसासाठी 589 रुपये तर सोयाबीनच्या हमीभावामध्ये 436 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. तुरीला 8000 रुपयाचा हमीभाव हा 2025-26 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. आज 28 मे 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये खरीप हंगाम 2025-26 करता 14 पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पाहिलं तर धान्यासाठी असलेला जो हमीभाव आहे हा 2300 रुपयाचा हमीभाव वाढवून 2369 करण्यात आलेला आहे याच्यामध्ये 69 वाढ करण्यात आलेली आहे तर ग्रेड ए च्या धान्यासाठी भातासाठी 2320 ऐवजी 2389 रुपये एवढा हमीभाव करण्यात आलेला याच्यामध्ये देखील 69 रुपची वाढ करण्यात आलेली आहे.


हायब्रिड ज्वारीसाठी असलेला 3371 रुपये हमी भाव आता 3699 रुपये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा 328 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. तर मालदांडी ज्वारीसाठी असलेला 3421 रुपयाचा भाव हा 3749 रुपय करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये 328 रुपची वाढ करण्यात आलेली आहे. बाजरीसाठी 2625 च्या ऐवजी275 भाव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 150 च वाढ करण्यात आलेली आहे.
मकासाठी 2225 रुपचा असलेला भाव 2400 रुपये करण्यात आलेले आहे याच्यामध्ये देखील 175 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे तुरीचा 7550 रुपयाचा हमीभाव हा 8000 करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये 450 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षी मुगाचा हमीभाव मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेला होता हा मुगाचा 8682 रुपये असलेला हमीभाव आता 8768 अर्थात 86 रुपयाने वाढवण्यात आलेला आहे. याचप्रमाणे जे काही इतर पिक आहे ज्याच्यामध्ये उडीद उडदासाठी असलेला 7,400 हा वाढ करून 7,800 करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 400 ची वाढ करण्यात आलेली आहे. भुईमुगासाठी चार असलेला 6783 रुपये हमीभाव वाढवून 7263 रुपये करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 480 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. सूर्यफुलासाठी असलेला 7280 चा हमीभाव आता 7721 अर्थात 441 वाढवण्यात आलेला आहे. सोयाबीन पिवडा 4892 असलेला हमीभाव 5,328 अर्थात 436 वाढ करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 6,000 पर्यंत हमीभाव दिला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु 436 रुपयाची वाढ या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता सोयाबीनला 5328 रुपये एवढा हमीभाव दिला जाणार आहे.

याचप्रमाणे तिळासाठी 9267 रुपचा हमीभाव आता 9846 रुपये करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2024-25 आणि खरीप हंगाम 2025-26 या दोन्ही वर्षांमध्ये सर्वाधिक वाढ होणार हे पीक आहे कापसासाठी आपण जर पाहिलं तर मध्यम धाग्याच्या कापसाला 7121 च्या ऐवजी 7710 अर्थात 589 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. तर लांब धाग्याचा जो कापूस आहे याच्यामध्ये देखील 7521 च्या ऐवजी 8110 रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे. अर्थात कापसामध्ये दोन्ही कापसासाठी 589 रुपची वाढ करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी व्याज अनुदान योजना कायम:

शेतक-यांसाठी २०२५ -२६ या आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना सूरू ठेवन्यास मंजूरी दिली. या अंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकाऱ्यांना स्वस्त दराने अल्पकालीन कर्ज उपलबद्ध होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर १५,६४० कोटी रुपयांचा भार पडेल. याअंतर्गत शेजाऱ्यांना स्वस्तदराने तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यावर ७ टक्के अनुदान व्याजदरावर दिले जाते. पात्र कर्ज संस्थांना यासाठी १.५ टक्का व्याज अनुदान दिले जाते.

किमान आधारभूत किंमत:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *