आज आयपीएल चा अंतिम सामना होणार आहे. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना होणार आहे. यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ला नवा विजेता मिळणार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार पावसाचा व्यत्यय आल्यास रिझर्वह डेचा नियम लागू रिझर्वह डे नुसार सामना चार जून रोजी खेळवला जाईल दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या पंजाब किंग्सची सगळी मदार श्रेयस अय्यर प्रियांश आर्या आणि प्रभुसिमरण सिंग यांच्यावर असणार आहे तर आरसीबीची मदार किंग कोहली आणि रजत पाटीदारवर असणार आहे त्यामुळे फायनल मध्ये कोणाची बॅट तळपणार आणि कोण आपल्या टीमला पहिल बाहिल विजेते पद मिळवून देणार याकडे साऱ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलंय.
पंजाबने रविवारी मुंबईला रोमांचक सामन्यात नमवून दिमाखात अंतिम फेरी गाठली आणि यासह यंदा आयपीएलमध्ये नवीन विजेता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. बंगळुरूने आधीच अंतिम फेरी गाठली असून, या दोन्ही संघांना अद्याप एकदाही आयपीएल चषक उंचावता आलेला नाही. त्यामुळे आज जेव्हा हे दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने-सामने येतील, तेव्हा तुल्यबळ लढत होईलच, पण दडपण झुगारून सर्वोत्तम खेळ करणारा संघच पहिल्यांदा हा झळाळता करंडक उंचावेल.
बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम लढत गाठली असून, त्यांना याआधी तीनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, पंजाबने दुसऱ्यांदा अंतिम फेरी धडक मारली असून, त्यांनी एकदा उपविजेतेपद पटकाविले. या निर्णायक लढतीत सर्वांचे लक्ष अर्थातच विराट कोहलीकडे लागले असेल. जर्सी क्रमांक १८ आणि आयपीएलचे सत्रही १८ वे असल्याने चाहते यंदाचे सत्र कोहलीच जिंकेल, असे भाकीत वर्तवीत आहेत. मात्र, ज्याप्रकारे पंजाबने रविवारी मुंबईला नमविले, ते पाहता बंगळुरुचे पुन्हा एकदा स्वप्न भंगेल, अशी शक्यताही काही चाहत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.बंगळुरूने पहिल्या प्ले ऑफ लढतीत पंजाबला सहज नमवून थेट अंतिम फेरी गाठली होती. याच कामगिरीतून प्रेरणा घेऊन ते आजही खेळतील.
आयपील मध्ये नेहमी यशस्वी ठरणाऱ्या कोहलीने यंदाही ६०० हून अधिक धावा काढत बंगळुरूला अंतिम फेरीत पोहोचविण्यात मोलाची भूमिका निभावली. युवा कर्णधार रजत पाटीदारने आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले. कोहलीच्या शानदार कामगिरीमुळे बंगळुरू संघाला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही कोहलीची कामगिरी संघासाठी महत्त्वाची ठरेल.
गोलंदाजीत बंगळुरू संघ संतुलित असून, त्यांची मदार वेगवान गोलंदाज जोश हेढ़ालवूडवर आहे. त्याचा अनुभव बंगळुरूच्या गोलंदाजांसाठी मोलाचा ठरत आहे. दुसरीकडे, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर फलंदाजीची मुख्य भिस्त आहे. मार्को यान्सेनच्या अनुपस्थितीत पंजाबची गोलंदाजी काहीशी कमजोर भासत आहे.
क्वालिफायर टू चा झालेला सामना:
आयपीएलमध्ये नेहमी यशस्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या क्वालिफायर टू चा सामना क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला. मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचा टॉस झाल्यावर पावसान खोडा घातला आणि त्यानंतर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सन मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून दारुण पराभव केला.
श्रेयस अय्यरन 27 चेंडूमध्ये दमदार अर्धशतक ठोकलं. दुसरीकडे रोहित शर्मा, बुमराह आणि बोल्ट चमकदार कामगिरी काही करू शकले नाही. आता रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स मध्ये फायनल होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आजपर्यंत कधीही विजेतेपद पटकावलेलं नाही त्यामुळे यंदा आयपीएलला नवे चॅम्पियन्स मिळणार आहेत. पंजाब किंग्स आणि आरसीबी सामना रंगणार.
पाऊस येणार?
रविवारी पंजाब-मुंबई यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना पावसामुळे सुमारे सव्वादोन तास उशिराने सुरू झाला होता. त्यामुळे मंगळवारीही अंतिम सामन्यात पावसाची चिंता आहे.अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा असून, संध्याकाळी मात्र ढगाळ वातावरण होत आहे.रविवारीही नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली होती. हवामान खात्याने मंगळवारी १५ टक्के पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अंतिम सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
सेनाप्रमुख येणार नाही:
बीसीसीआयने आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय सेनादल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना निमंत्रित केले होते.
यावेळी भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूराच्या यशाचा जल्लोष करण्यासाठी बीसीसीआयने विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, याद्वारे भारतीय सेनेला मानवंदना देण्यात येणार आहे.
मात्र, गुरुवारी सरकारकडून मिळालेल्या निर्देशानंतर या कार्यक्रमांमध्ये बदल झाला असून, भारतीय सेनादलाचे तिन्ही प्रमुख या समारोप सोहळ्यात सहभागी होणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. आजच्या सामन्यात पावसाच सावट आहे मात्र सामना दरम्यान पाऊस पडला तर चार जूनला सामना होणार आहे. चार जूनलाही पाऊस पडल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजय घोषित केल जाईल.