राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून सुनेत्रा पवार उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास अजित पवार यांचे राजकीय नरेश अरोरा यांनी यासदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुनेत्रा पवार यांनी या मोठ्या जबाबदारीसाठी आपला होकार कळवला असून त्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सुनेत्रा पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत अशी महत्त्वाची माहिती आहे. उपमुख्यमंत्री पदा संदर्भात सुनेत्रा पवार सकारात्मक असल्याच समजतय आणि राज्याला महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. सुनेत्रा अजित पवार यांच्या रूपाने या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
महत्त्वाच्या दोन गोष्टी?
याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी पक्ष म्हणजे जेव्हा जो एकसंध होता तेव्हा त्याचे दोन भाग झाले होते अजित दादा गट आणि पवार गट त्याच्यानंतर आता जेव्हा एवढा मोठा आघात पक्षावर झालेला आहे तेव्हा आताच्या नेत्यांना पुढे जाऊन कुठलाही प्रॉब्लेम किंवा समस्या नको आहे त्यामुळे सुनेत्रा पवार हे सर्वमान्य नाव सध्या तरी या सगळ्या नेत्यांना वाटतय.
दुसरी बाब अशी आहे की सुनेत्रा पवार या आता राज्यसभा खासदार दार आहेत त्या बारामतीवरून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढल्या होत्या आणि त्यांना सरकारी प्रशासनाचा अनुभव आत्ता नसला तरीही बारामतीमध्ये त्या अनेक संस्था चालवतातत्या बारामती टेक्स्टाईल कॉर्पोरेशन नावाची कंपनी चालवतात अनेक महिला जे महिला बचत गट असतात त्यांना त्यांनी उभं केलेल आहे अनेक सेवाभावी संस्थांशी त्या निगडीत आहेत त्या स्वतः एक एनजीओ सुद्धा चालवतात आणि पर्यावरण रक्षण असेल शाश्वत शेती असेल ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न असतील किंवा शहरी प्रश्न असतील या सगळ्यांशी सुनेत्रा पवार खूप चांगल्या रीतीने अवगत आहेत त्याच्यामुळे त्या जे ना त्या राजकारणात नवख्या आहेत ना त्या समाजकारणात नवख्या आहेत फक्त आतापर्यंत कुठलं राजकीय मोठं पद त्यांच्याकडे नव्हतं एवढाच मुद्दा आहे मात्र ते अनुभवाने येतं त्यात काही फार मोठी बाब अशी नाहीये.
याच्या आधी पण आपण आजची अनेक उदाहरण पाहिलेली आहेत त्याच्या सगळ्यात मोठं उदाहरण देता येईल ते सोनिया गांधी यांच म्हणजे त्या तर परदेशी नागरिक होत्या मात्र जेव्हा सोनिया गांधी राजकारणात आल्या तेव्हा आज गयत त्या काँग्रेसच्या सर्वाधिक कार्यकाळ असलेल्या अध्यक्ष राहिलेले आहेत हे उदाहरण यासाठी दिलं आता सोनिया गांधी किंवा काँग्रेस काही संबंध नाही मात्र एखादी व्यक्ती जर का सरकारच्या सिस्टीम मध्ये किंवा ्याच्यामध्ये नसेल याचा अर्थ ती त्याच पुढे यशाची गॅरंटी नाही वगैरे असं काहीही नसतं सुनेत्रा पवार यांच ज्ञान त्यांचा आवागा त्यांचा ग्रास्पिंग पावर ही प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण पक्षाला यांच्याकडन आता प्रचंड अपेक्षा आहेत.
राष्ट्रवादीचे सगळे जण सुनीत्रा पवार यांच्या नावासाठी अनुकूल आहेत का?
आपण म्हणतोय की पक्षाला निश्चित अपेक्षा आहेत राज्याला निश्चित अपेक्षा आहेत पण पक्षांतर्गत गोटात काय सुरू आहे म्हणजे जे काही महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते सगळे जण सुनीत्रा पवार यांच्या नावासाठी अनुकूल आहेत का? तर हो आपण जर पाहिलं की अक्रॉस लीडर्स जस आपण आता पाहिलं की प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे सगळी राष्ट्रवादी काँग्रेस मधली मोठी मोठी नाव आहेत आणि हे स्वतः अतिशय जेष्ठ नेते म्हणजे हे राष्ट्रवादीस स्थापनेपासून पवार काका पुतण्या सोबत आहेत या सगळ्यांच एकच मत आहे की सुनेत्रा पवारांना असं उपमुख्यमंत्री करावं कारण जे तळागळातले कार्यकर्ते आहेत.
आणि आपण काल पाहिल रीती की अजित पवारांच्या अंतयात्रेला केवढी लाखो लोकांची गर्दी झाली होती त्यामुळे जे एक मोठे लोकनेते होते अजित दादा पवार त्याच्यामुळे त्यांच फॉलोंग त्यांची लोकप्रियता ही प्रचंड आहे लोकांच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत तीव्र भावना आहेत आणि अशा वेळी उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जातं याच्या याला अनेक राजकीय परिमाण पण प्राप्त होतात एका अर्थाने सिग्नलिंग पण असत ते आणि त्या सगळ्या याच्यात अजित पवारांच्या पत्नी यापेक्षा अजून कुठला म्हणजे नेता किंवा उमेदवार या पदासाठी असूच शकत नाही.
शपथ विधीची वेळ व स्थळ:
आज सायंकाळी साडे पाच (5:00 pm) वाजता सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
हा कार्यक्रम मुंबईतील राजभवन/लोकभवन येथे होण्याची शक्यता आहे.
स्थिती आणि महत्त्व:
सुनेत्रा पवार हे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेणाऱ्या नेत्यांपैकी एक ठरतील.
ही नियुक्ती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी केली जात आहे.

