पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी,बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुकुंजात उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्या प्रमुख मागण्या पावसाळी अधिवेशनात सोडविण्यात येतील, तूर्तास त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. या सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करूनच उपोषण थांबविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे कडू म्हणाले.

कडू यांच्या उपोषणाचा शुक्रवारी सहावा दिवस होता. मागण्यांबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पालकमंत्री काहीतरी तोडगा घेऊन येतील, अशी आशा वर्तविण्यात येत होती. त्यांच्या आश्वासनांना दाद न देता बच्चू कडू ठाम राहिले. दरम्यान, गुजरातेतील विमान अपघातामुळे प्रहारकडून १४ जूनला राज्यात होणारे आंदोलन आता १५ जूनला करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच उपोषण थांबविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी संवाद:

पालकमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिला. दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लवकरच समिती गठित करण्यात येईल. कर्जाची वर्गवारी तयार करून अहवाल सादर करण्यात येईल. येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत सरकार निर्णय घेईल, तूर्तास त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली असे मंत्री बावनकुळे म्हणाले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पालकमंत्री काहीतरी तोडगा काढतील, अशी आशा होती. परंतु, त्यांच्या आश्वासनांना दाद न देता बच्चू कडू ठाम राहिले. दरम्यान, गुजरातेतील विमान अपघातामुळे प्रहारकडून १४ जूनऐवजी १५ जूनला राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.

बच्चू कडूंच्या कोणकोणत्या मागण्याबद्दल सरकारने प्रस्ताव दिले

बच्चू कडूंची मागणी क्रमांक एक – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तर समिती स्थापन करू असा सरकारचा प्रस्ताव आहे, म्हणजे या मागणीवर तोडगा नाहीये. दुसरी मागणी – दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपयाचं मानधन मिळावं सरकारने असं म्हटलं की मानधन आम्ही वाढवू पण किती वाढवू आणि कधीपर्यंत वाढवू हे मात्र स्पष्ट केलं नाहीये. तिसरी मागणी – बच्चू कडूंची शेतमालाला एम एस पी नुसार 20 टक्के अनुदान शेतमालाला अनुदानाचा सरकारचा प्रस्ताव आहे पण याही मुद्द्यावर तोडगा निघालेला नाही

काँग्रेस, शरद पवार गटाचा पाठिंबा:

काँग्रेस आणि शरद पवार गटाने या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. बच्चू कडूंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी आम्ही सहमत असून, त्यासाठी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करीत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

प्रकृती खालावली:

उपोषणाच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी सकाळी बच्चू कडू यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी औषधोपचार घेण्याची विनंती केली.

मात्र, कडूंनी साफ नकार दिला. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील सुमन साळवे या उपोषणकर्त्या महिलेची शुगर लेव्हल ४०० पार गेली आणि रक्तदाबही वाढला होता.

बच्चू कडूंच्या विनंतीवरून त्यांच्यासह वयोवृद्ध चार उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, काँग्रेसचे अॅड. दिलीप एडतकर, मनसेचे प्रकाश महाजन उपस्थित होते.

मुलाचाही सहभाग:

बच्चू कडू यांच्या मुलानेही उपोषणात सहभाग घेतला. देवा कडूचा उपोषणाचा पाचवा दिवस होता.

वरुड येथे विषपान:

वरुड ते मोझरी दुचाकी रॅलीपूर्वी प्रहारचे वरुड तालुका संपर्कप्रमुख अजय चौधरी (३५) यांनी शुक्रवारी विष प्राशन केले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बच्चू कडू यांच्यासाठी जरांगे उतरणार मैदानात:

बच्चू कडूयांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मैदानात उतरणार असून, १५ जून रोजी राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात राज्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या आणि मागण्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात शेतकरी संघटनांकडून १५ जून रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.

अंबड तालुक्यातील शहागड पैठण फाट्यावरील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ जरांगेदेखील स्वतः रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसाचे काम बाजूला ठेवून चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य:

बच्चू कडूजींनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न गंभीर प्रश्न घेऊन उपोषणाला बसले आहेत, आमचा त्यांना पाठिंबा आहे जो जो शेतकऱ्यांसाठी लढेल त्याला आम्ही पाठिंबा देणार आणि त्याच्यासोबत पाठिंबा आमचा असणार आहे 15 तारखेपर्यंत जर आंदोलन असेल 15 ला आम्ही अकोल्याला आहोत त्यावेळेस आम्ही त्या बच्चू कडूनची स्वतः भेट घेणार आहे आणि आम्ही जाणार आहोत.

चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडूंना विनंती:

चंद्रशेखर बावनकुळे यांचे असे म्हणणे आहे की, मी स्वतः तिथे जाऊन त्यांना विनंती करणार आहे की जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्यावर शासनाने त्यांना रिपोर्ट दिलाय ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन घेत आहेत. काही मागण्या धोरणात्मक आहे त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल काही फायनान्शिअल त्या ठिकाणी प्रोविजन करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणाव्या लागतील, त्याच्यानंतर त्यांचे निर्णय होणार आहे. पण देशातली अहमदाबाद ची घटना बघता आणि एवढा मोठा अपघात बघता देशावरचा मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपला उपोषण मागे घ्यावं, आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील आजबाजू सोडून आंदोलन संपेल असं मला वाटतं. देशातली परिस्थिती विचारत घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *