प्लॅस्टिकच्या जाळ्यातली पृथ्वी कधी सुटणार?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

प्लॅस्टिक नावाची ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे. स्वतः पासून सुरुवात करून प्रत्येकाने सक्रियपणे प्लॅस्टिकविरोधी लढा उभारण्याची हीच वेळ आहे.

प्लॅस्टिक प्रदूषण हा विषय आजच्या काळात अत्यंत ज्वलंत प्रश्न झालाय टिकाऊ पणा आणि स्वस्तचे मुळे जगभर प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरलं जातं मात्र हेच प्लॅस्टिक शेकडो वर्ष न विघटित होणारे माती पाणी आणि हवामानात प्रदूषण निर्माण करणारे तसेच प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणार आहे समुद्रात फेकलेले प्लास्टिक मासे कासव पक्षी यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते त्याचप्रमाणे सूक्ष्म प्लॅस्टिक मानवी शरीरातही प्रवेश करते जे आरोग्यासाठी चिंताजनक आहे.

प्लॅस्टिकच्या विषारी विळख्यात आज पृथ्वी तडफडते आहे. भारत जगातील प्रमुख प्लॅस्टिक प्रदूषक देशांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे ९.४६ दशलक्ष टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. नद्या, समुद्र, जमीन आणि हवा सर्वत्र प्लॅस्टिकचा कहर झाला आहे. प्लॅस्टिक नाही, असे ठिकाण शोधूनही सापडणार नाही. हे प्लॅस्टिक केवळ वन्यजीवांचे नव्हे तर मानवी आरोग्याचेही मुळापासून नुकसान करते. मातीची सुपीकता, पाण्याची शुद्धता आणि जीवसृष्टीची समृद्धी यावर घातक परिणाम करते. आज साजरा होणारा पर्यावरण दिन फक्त औपचारिकता न राहता, प्रत्येकाने सक्रियपणे प्लॅस्टिकविरोधी लढा उभारण्याची हीच वेळ आहे.

‘प्लॅस्टिक’ या नावातच सुविधा दिसते; पण परिणामात पर्यावरणाचा संहार आणि माणसाच्या आरोग्याला धोका आहे. वन्यजीव, माणूस आणि पर्यावरण यांचा जणू संथ मृत्यू चालू आहे. आजच्या आधुनिक जगात प्लॅस्टिकशिवाय जीवन अशक्य वाटते. घराघरात, दुकानात, रस्त्यावर, ऑफिसमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचाच सुळसुळाट आहे. जगभरात १९५० पासून आजवर सुमारे ९.२ अब्ज टन प्लॅस्टिक तयार झाले असून, त्यातील ७ अब्ज टन प्लॅस्टिक कचऱ्यात रूपांतरित झाले आहे. हा कचरा तलाव, नद्या, समुद्र, माती सर्वत्र विखुरलेला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. दरवर्षी ४३० दशलक्ष टन प्लॅस्टिक तयार होते आणि त्यातील दोनतृतीयांश कचऱ्यात जाते आपली हीच ‘सोय’ आता आपल्या जिवावर उठली आहे. प्लॅस्टिकचा कचरा नद्यांमध्ये, समुद्रात, जमिनीत मिसळतो. तब्बल ८००हून अधिक प्रजातींना प्लॅस्टिकमुळे धोका निर्माण झाला आहे. मासे, कासवे, पक्षी हे प्लॅस्टिक गिळून मरतात. शेतजमीन नापीक होते. पाण्याचा निचरा थांबतो. पूर येतात. मुंबई, पुण्यासारखी महानगरे वारंवार तुंबण्यामागे प्लॅस्टिकचा मोठा हात आहे. प्लॅस्टिकच्या कृपेने इतर शहरांतही ही समस्या वाढू लागली आहे.

प्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात कसे जातात:

प्लॅस्टिकमधील विषारी रसायने, मायक्रोप्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात श्वास, पाणी, अन्न, त्वचा यांच्या माध्यमातून प्रवेश करतात. ही रसायने हार्मोनमध्ये बदल घडवतात. प्रजननशक्ती कमी करतात. त्यातून असंख्य आजार निर्माण होतात. गर्भवती महिलांपासून लहान मुलांपर्यंत, वृद्धांपासून तरुणांपर्यंत कोणीही या घातक परिणामांपासून सुटलेला नाही. एका संशोधनानुसार, दर आठवड्याला आपण सरासरी ५ ग्रॅम प्लॅस्टिक खातो म्हणजे एका क्रेडिट कार्डाएवढे ! विचार करा, महिन्याला वर्षाला आपल्या पोटात किती प्लॅस्टिक जात असेल?

प्लॅस्टिकच्या डब्यात आपण गरम अन्न भरतो. प्लॅस्टिकच्या डब्यातूनच ते कार्यालयात, शाळा-महाविद्यालयांत नेतो. पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, पॅकेजिंग हे सगळे प्लॅस्टिकचेच! अशा माध्यमातून प्लॅस्टिक आपल्यात शिरते. प्लॅस्टिकमधील फॅलेट्स, बीपीए, कॅडमियम, पारा, सीसा हे सर्व घटक शरीरातील हार्मोन्स, चयापचय, मेंदू, प्रजनन क्षमता, प्रतिकारशक्ती यावर थेट घातक परिणाम करतात.

जनवरांवर आणि जलचर प्राण्यांवर प्लॅस्टिकचे होणारे दुष्परिणाम :

आता प्लास्टिक मुळे जनावरावर काय परिणाम होतो तर आजच्या यांत्रिक युगात प्लास्टिकचा वापर जिवणाचा अविभाज्य भाग झाला मात्र याचे दुष्परिणाम केवळ माणसापुरते मर्यादित राहिलेले नाहीत पाळीव प्राणी, जनावरे समुद्र जीव आणि पक्षावरही यांचा गंभीर परिणाम होतोय. पचन संस्थेवर गंभीर परिणाम होतो.अनेकदा प्लास्टिक पिशव्या बाटल्या किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळलेले अन्न प्राणी खरे अन्न समजून खातात हे प्लास्टिक त्यांच्या पोटात साचून पचन संस्थेचे विकार भुकेने मृत्यू किंवा आतड्यांचे कार्य बंद पडण्यास कारणीभूत ठरते. जनावरे चुकून प्लास्टिक खातात तेव्हा त्यांना त्रास होतो अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. गिळलेल्या प्लास्टिक पोटात साठवते आणि त्यामुळे भूक लागण्याची भावना कमी होते. परिणामी प्राणी कमी अन्न खातात त्यांना कमी ऊर्जा मिळते आणि ते अशक्त होतात मोठ्या आकाराचा प्लास्टिक जनावरांच्या मार्गात अडकवू शकते ज्यामुळे ते बाहेर टाकता येत नाही काही वेळा प्लास्टिक पोटात बारीक होते आणि नंतर सर्वत्र पसरत. उदाहरणार्थ, नॉर्दन फुलमार नावाचा पक्षी दरवर्षी लाखो प्लास्टिकचा तुकड्यांना बारीक करून पसरवतो त्यातील काही तुकडे सोडून दिलेल्या घरट्यांच्या ठिकाणी आढळतात प्राणीजवळ प्लास्टिक युक्त अन्न खातात तेव्हा ते अन्नसाखळीच्या माध्यमातून पुन्हा माणसापर्यंत पोहोचतात.

मासे कासव नकळतपणे प्लास्टिक खातात अगदी व्हेल माश्याच्या पोटात टनभर प्लास्टिक सापडलंय दीर्घकालीन तसेच संशोधनानुसार नॉर्दन फुलमार या पक्षाच्या पोटात सरासरी पंचवीस प्लास्टिकचे तुकडे सापडतात डिसेंबर २०१८ मध्ये इंडोनेशियातील वाकटोबी नॅशनल पार्क येथे किनाऱ्यावर सापडलेल्या एकाच फॉर्म वेलच्या पोटात 115 कप प्लॅस्टिक, 25 प्लास्टिक पिशव्या चार बाटल्या आणि दोन चपला आढळल्या वेलच्या पोटात सहा किलो वजन भरेल एवढे प्लास्टिकचे तुकडे होते संयुक्त अरब अमेरिका मध्ये प्लास्टिक खाल्ल्यामुळे उंटाचा मृत्यू दिसून आलेत त्यांच्या पोटात दहा ते सात किलो वजनाचे प्लास्टिकचे मोठे गोळे आढळतात कारण हे प्लास्टिक शरीरातून बाहेर टाकता येत नाही म्हणून हे गोळे पोटात वाढत जातात.

जुलै 2010 मध्ये ब्राझील मधील एका किनाऱ्यावर एक तरुण हिरवे कासव अत्यंत अशक्त अवस्थेत सापडले आणि काही तासात मरण पावले या कासवाच्या आतड्यामध्ये 3267 प्लास्टिकचे तुकडे आणि पोटात तीनशे आठ तुकडे सापडले हे केवळ पाच मीमी पेक्षा मोठे प्लास्टिकचे तुकडे होते प्लास्टिक मुळे जनावरांच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये अडकल्यामुळे अनेक वेळा पक्षांचा गळा गोटला जातो इतर प्राण्यांना श्वास घेण्यास गंभीर अडथळा निर्माण होतो उदाहरणार्थ प्लास्टिकच्या पिशव्या बरण्याचे झाकण किंवा बाटलीमध्ये अडकून पक्षाचा श्वसन मार्ग बंद होता, त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. दम लागल्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो, काही वेळा लहान प्राणी किंवा जलचर प्राणी जास्तीच्या पिशव्या किंवा जाळ्यामध्ये अडकतात ज्यामुळे त्यांची हालचाल कमी होते श्वास घेण्याची क्रिया बिघडते अशा स्थितीत हे प्राणी दीर्घकाळ अन्न व हवा ना मिळाल्यामुळे तडफडून मरतात काही प्राणी चुकून प्लास्टिक गिळतात हे प्लास्टिक त्यांच्या श्वसन मार्गात अडकते अशा प्रसंगी तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित असतो समुद्रातील डॉल्फिन कासव वेल यांच्यामध्ये असे प्रकार वारंवार पाहायला मिळतात.

नर मादीवर होणारे परिणाम:

आता आपण नर मादीवर होणारे परिणाम पाहुयात मादी जनावरांमध्ये मात चक्रात अनियमित अंड ऊसर्जनात अडथळा गर्भधारणेचे प्रमाण कमी होते गर्भपात किंवा अपूर्ण गर्भवाड दिसून येते नर जनावरांमध्ये शुक्राणूंची संख्या हालचाल आणि गुणवत्ता कमी होते तसेच निर्माण होण्याची शक्यता असते. गर्भधारणातील गुंतागुंती सूक्ष्म प्लास्टिक कण गर्भाशयात पोचल्यास भ्रुणाचा विकार विकासावर विपरीत परिणाम होतो, काही प्राण्यांमध्ये गर्भतील पूर्ण वाढ भ्रूण मृत्यू किंवा जन्मजात द्वेष निर्माण होतात प्रयोगात्मक पुरावे प्रयोगशाळेत उंदीर आणि माशांवर केलेल्या अभ्यासात सूक्ष्म प्लास्टिकच्या संपर्कामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट झाल्यास आढळले. कोंबड्यांमध्येही असे परिणाम दिसून येतात रसायनांचा प्रभाव पर्यावरणात विखुरलेल्या प्लास्टिक विविध प्रकारच्या प्राण्यांद्वारे अन्न समजून गेले जाते.

प्लॅस्टिकवर बंदी:

महाराष्ट्रात २०१८ पासून एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. केंद्र सरकारनेही २०२२ पासून देशभरात बंदी लागू केली; पण प्रत्यक्षात काय? बाजारात अजूनही प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट्स खुलेआम मिळतात. प्रशासन, पोलिस, नागरिक सगळ्यांची ‘आम्ही काय करायचं?’ अशीच मानसिकता! कायद्याची अंमलबजावणी जवळपास शून्य. दंडाचा धाक कोणालाच नाही. नागरिकांमध्येही पुरेशी जागरूकता नाही. अशा स्थितीत प्लॅस्टिकच्या या संकटाला रोखणार कोण?

‘एवढ्या मोठ्या जगात मी एकट्याने काय फरक घडवणार?’ ही मानसिकता प्रत्येकाने आधी सोडायला हवी. बदलाची सुरुवात स्वतःपासून, तातडीने, म्हणजे पर्यावरणदिनीच करायला हवी. सर्वात आधी प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा. कापडी पिशव्या, काचेच्या बाटल्या, स्टीलचे डबे वापरणे सुरू करायचे.

शासनानेही ठोस भूमिका घ्यायला हवी. प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई, अशी दुकाने ‘सील’ करणे याला वेग हवा. नागरिकांनी प्लॅस्टिक घेतल्यास त्यांनाही दंड केला जावा. शाळा, महाविद्यालये, संस्था या ठिकाणी प्लॅस्टिक विरोधी मोहिमा, रिसायकलिंग उद्योगाला प्रोत्साहन, घराघरात कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि रिसायकलिंग अनिवार्य करणे असे मार्ग चोखाळायला हवे. प्लॅस्टिकमुक्ती हा अस्तित्वाचा लढा आहे. आज आपण बदल घडवला नाही, तर उद्या शुद्ध पाणी, हवा, अन्न, आरोग्य हे सर्व फक्त स्वप्न ठरेल. ‘प्लॅस्टिकमुक्त भारत’ ही घोषणा नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला, संकल्प करूया… ‘प्लॅस्टिकचा वापर थांबवू, आरोग्याचा शत्रू दूर करू आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ, निरामय सुरक्षित भारत घडवू !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *